Skip to main content

Posts

व्यवहारावर बोलू काही

​ 🖋️🖋️🖋️ *सौ .रुपाली राहुल जाधव * *व्यवहारावर बोलु काही * व्यवहार हा शब्द लिहायला ,वाचायला जितका अवघड तितकाच तो जपायला  हि तितकाच अवघड .मुळात तो जोडाक्षर असल्यामुळे बऱ्याच जणांच्या पचनी पडत नाही .आपण आपल्या दैनंदिन जीवनात बरेच व्यवहार करत असतो .त्या पैकी आज आपण सोन्या -चांदीच्या व्यवहारावर बोलू काही .आपल्या भारतात सोने गुंतणुकीला फार महत्व आहे .शास्रात सोने खरेदीचे साडेतीन मुहूर्त ,गुरूपुष्य अमृत योगा च्या खरेदीचे अनन्य साधारण महत्व आहे .*सोन्या -चांदीचा व्यवहार तितक्याच निगुतीनं झाला पाहिजे ,जपला पाहिजे .*  प्रथम ग्राहकाने ठरवायला हवं आपण सोने -चांदी गुंतवणूक म्हणून घेणार  ,हौस म्हणून घेणार कि लग्न कार्यासाठी म्हणून घेणार ? गुंतवणूक म्हणून घ्यायचं तर चोख सोने ,वेढे ,कॅडबरी ,(खाण्याची नाही हं 😀),भिस्कीट स्वरुपात घ्यावी . परंतु आपणास जेव्हा हौस म्हणून दागिने घ्यायचे असतात ते आपण कोणत्या स्वरूपात घ्यायचे ते ठरवून घ्यावे 24कॅरेट मधील पाटल्या ,बांगड्या ,पोहे हार ,डाई पोत ,चैन ,गोफ इ .इ . फॅन्सी दागिने हे शक्यतो 22कॅरेट ,हॉल मार्क पासिंग असणारेच घ्यावे .म्हणजे exchange करण...

श्रीमद रामायण

​ *🖋️🖋️🖋️ सौ .रुपाली राहुल जाधव ,बागलाण  *एक राम भक्त ,सरस्वती उपासक* *श्रीमद रामायण* अदभुत ,अतुलनीय ,अवर्णनीय ,अविस्मरणीय ,अतिशय सुंदर अशी कलाकृती म्हणजे सोनी टिव्ही वर सध्या प्रसारित होणारे महाकाव्य श्रीमद रामायण .2024हे वर्ष खरोखर रामयुग सुरु झाल्या सारखं वाटलं .अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले आणि अवघी धरा राममय झाली .त्यात हि मालिका खरोखर तिचे प्रोमोज बघून ती प्रत्यक्षात कधी बघता येईल ह्याची उत्सुकता ,उत्कंठता तर होतीच . स्वस्तिक production ने जन -सामान्यांच्या मनामनात असणारे महाकाव्य छोटया पडद्यावर आणायला प्रचंड मेहनत घेतली आहे .कलाकारांची योग्य निवड ,वेशभूषा ,सेट ,गायन ,वादन ,संगीत ,संवाद सगळं कसं एका पेक्षा एक सरस .तस बघायला गेलं तर छोट्या पडद्यावर रामायण बघण्याची माझी हि 3री वेळ .रामायण चे पूर्ण कथानक माहिती असून पुढे काय घडेल ?ह्या पेक्षा घडलेलं आपल्या समोर कसे येईल या बाबत उत्कंठता जास्त होती . ह्यातील सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिलेला आहे .ह्यातील एकही पात्र खोटं वाटत नाही .किंवा खलनायकही वाटत नाही .प्रत्येक घटनेची कारणं अगदी बारीक सारीक तपशीला सह ...

varanasi ,kashi ,banaras

​ *ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव*  Banaras ,kashi or Varanasi is the spiritual capital of India. वरुण आणि असी नदीच्या काठावर वसलेलं वाराणसी शहर .ह्या शहरात काय काय आहे ?संगीत ,साहित्य ,कला ,संस्कृती ,अध्यात्म ,मोक्ष ,ज्ञान ,घाट इ .विविध अलंकारांनी हे शहर नटलेलं आहे .सर्वात प्राचीन शहर ,त्यातल्या त्यात पौराणिक मान्यतेनुसार भगवान शंकराच्या त्रिशूळावर वसलेलं शहर .मनात खूप सारी उत्सुकता ,उत्कंठता घेऊन नाशिक हुन आमचा वाराणसी प्रवास सुरु झाला . रात्रीच्या झगमटात सजलेल्या वाराणसीत आम्ही दाखल झालो तेव्हा कुणाच्या तरी लग्नाचे फटाके आकाशाचे सौन्दर्य वाढवत होते .त्या पावन भूमीला स्पर्श करताना ती फटाक्यांची आतिष बाजी जणू आमचे स्वागत करत होती .त्यातच लग्नाच्या वरातीत "दामादजी पधारो हमारे देश " हे लोक गीत  चालू होते .साक्षात भगवान भोलेनाथांनी आपल्या लेक -जावयाच स्वागत केलं असा भास आम्हाला झाला .प्रवासाचा थकवा जाऊन आम्ही काशीच्या गर्दीत सामावुन गेलो .   काशी विश्वेश्वराला समर्पित ,12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचे ज्योतिर्लिंग ज्याच्या केवळ स्मरणाने आपण पाप मुक्त होतो त्या मंदिरात प्...

सोशल मिडिया दुधारी शस्र

​ *सोशल मिडिया दुधारी शस्र * सोशल मीडियाने आम्ही संवाद साधण्याच्या, माहितीची देवाणघेवाण करण्याच्या आणि इतरांशी कनेक्ट करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणली आहे. हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे, आपण मित्र, कुटुंब आणि आपल्या सभोवतालच्या जगाशी कसे संवाद साधतो ते आकार देतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असंख्य फायदे देत असताना, ते सादर करू शकतील संभाव्य कमतरता ओळखणे आणि त्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. या लेखात, आपण सोशल मीडियाचे उपयोग आणि तोटे शोधू, त्याचा संपूर्ण व्यक्ती आणि समाजावर होणारा परिणाम यावर प्रकाश टाकू. सोशल मीडियाचा वापर: संप्रेषण आणि नेटवर्किंग: सोशल मीडियाच्या प्राथमिक उद्देशांपैकी एक म्हणजे संवाद आणि नेटवर्किंग सुलभ करणे. Facebook, Twitter आणि LinkedIn सारखे प्लॅटफॉर्म व्यक्तींना मित्र, कुटुंब, सहकारी आणि जगभरातील अनोळखी व्यक्तींशीही कनेक्ट होऊ देतात. हे विचार, अनुभव आणि अद्यतने सामायिक करण्याचा एक सोयीस्कर मार्ग प्रदान करते, भौतिक अंतराकडे दुर्लक्ष करून. माहितीची देवाणघेवाण आणि जागरूकता: सोशल मीडिया माहितीचा वेगाने प्रसार करण्यासाठी एक शक्तिशाली साधन म्हणून का...

वाद तर वाद पण संवाद व्हायला हवाच

​ *संवादाचे महत्व * *वाद तर वाद पण संवाद व्हायला हवाच * वाढत्या एकमेकांशी जोडलेल्या जगात, संभाषणाला आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. संवादाचे साधन असण्यापलीकडे, संभाषण व्यक्ती, समाज आणि संस्कृतींना जोडणारा पूल म्हणून काम करते. हे आपल्याला कल्पनांची देवाणघेवाण करण्यास, नातेसंबंध निर्माण करण्यास आणि आपल्या सभोवतालच्या जगाची सखोल माहिती मिळविण्यास अनुमती देते. या लेखात, आम्ही संभाषणाचे महत्त्व आणि ते वैयक्तिक वाढ, सहानुभूती आणि दोलायमान समुदायांच्या विकासासाठी कसे योगदान देते ते शोधू. विचार आणि कल्पना व्यक्त करणे: संभाषण आपल्याला आपले विचार, कल्पना आणि मते व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. संवादामध्ये गुंतून, आम्ही आमचे दृष्टीकोन स्पष्ट करू शकतो, ज्ञान सामायिक करू शकतो आणि विद्यमान कल्पनांना आव्हान देऊ शकतो. संभाषणाद्वारे, आपण आपले विचार सुधारू शकतो आणि जटिल संकल्पनांची स्पष्ट समज प्राप्त करू शकतो. विचारांच्या देवाणघेवाणीतूनच नवकल्पना आणि प्रगती वाढीस लागते, कारण संभाषणे नवीन अंतर्दृष्टी आणि उपायांसाठी उत्प्रेरक म्हणून काम करतात. वैयक्तिक वाढ वाढवणे: अर्थपूर्ण संभाषणांमध्ये वैयक्ति...

Rising Inflation in India: Understanding the Factors and Possible Solutions

  Inflation is a measure of the rate at which the general level of prices for goods and services is rising and subsequently, purchasing power is falling. In India, the inflation rate is typically measured by the Consumer Price Index (CPI). As of 2023, the inflation rate in India has been on the rise. According to data released by the government, the CPI-based inflation rate in December 2022 was at 7.35%, up from 6.93% in November. This increase in inflation can be attributed to several factors, including rising food and fuel prices. One of the main drivers of inflation in India has been the increase in food prices. The prices of vegetables, in particular, have seen a significant spike in recent months. This is due to a combination of factors such as supply disruptions caused by the COVID-19 pandemic and unseasonal rains affecting crop production. Another factor contributing to inflation in India is the rise in fuel prices. The prices of petrol and diesel have been on the rise in re...

G20 Summit 2023: Focusing on Economic Recovery, Climate Change, and Inequality

  G20 Summit 2023: Focusing on Economic Recovery, Climate Change, and Inequality The G20 summit is an annual forum for the leaders of the world's 20 largest economies to discuss and coordinate policies on a wide range of global economic and financial issues. The 20 member countries, which include the United States, China, Japan, Germany, and the United Kingdom, represent around 80% of the world's GDP, 75% of international trade, and two-thirds of the world's population. The 2023 G20 summit, which will be the 14th such meeting, is expected to focus on key issues such as economic recovery from the COVID-19 pandemic, climate change, and inequality. With the world still reeling from the economic fallout of the pandemic, leaders will likely discuss ways to boost growth and create jobs, as well as ways to ensure that the recovery is inclusive and benefits all citizens. Climate change is also expected to be a major topic of discussion at the 2023 summit. The world is currently not...

"Exploring India's GDP Growth: Challenges and Opportunities"

India's GDP growth has been a topic of much discussion in recent years. The country has seen a steady growth in its GDP, with an average annual growth rate of around 7%. However, there have been fluctuations in this growth rate, with some years seeing higher growth and others seeing slower growth. In 2019-20, the Indian economy grew at a rate of 4.2% due to the global slowdown and the domestic challenges posed by the Covid-19 pandemic. The country went into a technical recession with two consecutive quarters of negative growth. The year 2020-21 saw India's GDP shrink by 7.7%, which was the worst contraction in the country's history. The government and the Reserve Bank of India took various measures to revive the economy and the GDP growth rate for the next fiscal year 2021-22 is expected to be around 11%. The Indian government has been taking various steps to boost the economy, such as implementing structural reforms, investing in infrastructure, and promoting foreign inves...

विवाह -एक संस्कार कि नुसताच सोहळा

​ विवाह -एक संस्कार की नुसताच सोहळा  आपल्या हिंदू संस्कृतीत विवाह हा सोळा संस्कारांपैकी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा संस्कार आहे .विवाह हा फक्त वधू -वरांचा होत नसतो तर तो दोन परिवाराचा ,विचारांचा ,प्रथांचा ,आपुलकीचा अन प्रेमाचा होत असतो .वरमाळा ,अंतरपाट ,आणि इतर सौभाग्य लेणी ह्या मोजक्या सामग्रीत होणारा विवाह आता इतिहास जमा झाला आहे . आताचे विवाह सोहळे बघितले कि अंगावर काटा आल्या सारखे होते .काय तो थाट ,काय तो खर्च ,काय ती गर्दी अजिबात ok वाटत नाही .पूर्वी काही भागांपुरती मर्यादित असणारी 5-5 दिवसांचे लग्न विधी आता सगळीकडेच जोर धरू लागले आहेत .आम्हाला हुंडा नको ,मानपान नको च्या नावाखाली मुलांची हौस तेव्हडी पुरविली जाते .speed gun हातात घेतलेले सैनिक आणि कॅमेरे ,ड्रोन घेऊन फिरणारे फोटो ग्राफर ,इव्हेंट मॅनेजर मला सारखेच वाटतात .गदिमांच्या ओळींसारखे *प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट * प्रत्यक्षात त्या जोडप्याला थंडी वाजत असो ऊन लागत असो फोटो मात्र उत्तम आला पाहिजे .हा अट्टाहास नेमका कशासाठी ?आपल्या जीवनातील महत्वाच्या घटनेची साक्ष म्हणून फोटो हवेत कि खास फोटोसाठी लग्न करायचे असा प्रश्न मला ...

सावित्री बाई फुले

आद्य महिलाशिक्षिका          (क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शीर्षक -खरी शिल्पकार माय माऊली सावित्री शिक्षणाची पुरस्कर्ती क्रांतिज्योती,ज्ञानज्योती अशी संयमी धरीत्री लेक ही सत्यवतीची बाणा धाडसी,करारी  दिली आयुष्यात तूच अत्याचारा ललकारी साही दगड,चिखल झेप अशी उंच घ्याया भिडेवाडी काढी शाळा स्त्रीशिक्षण रची पाया माय अनाथांची होई सेवा रूग्णांचीही करी सावित्रीच्या लेकी आम्ही अभिमान उंचावरी जीवनास उद्धारले तूच खरी शिल्पकार माता सावित्री माऊली फेडू कसे उपकार सौ हेमलता विसपुते  वाशिम

सावित्री बाई फुले

​ *मी लेक सावित्रीची * सावित्री माय केवळ तुझ्यामुळे  आज मी इथे उभी आहे  तू झेलले लोकांचे शेण ,गोळे मोठ्या मनाने  म्हणुन मी आज इथे  बोलते आहे ताठ मानेने.         सावित्री माय केवळ तुझ्या मुळे        माझ्या पाटीवर अक्षरे कोरली गेली        ज्योतीबांच्या साथीमुळे विधवांच्या       नशिबाची द्वारे खुली झाली  सावित्री माय तू ज्योतिबांसाठी  कि ज्योतिबा तुझ्या साठी जगले  हा मुददा गौण आहे  पण तुम्हा दोघांच्या पुण्याईने  आमच्या जगण्याचा स्तर उंचावला आहे         सावित्री माय केवळ तुझ्या मुळे         अनाथांना आश्रय मिळाला        तुम्ही सामाजिक कार्याचा विडा उचलला       त्यामुळे आजच्या स्रिया ह्या       केवळ उंबरठ्याआड नाही अडकल्या  माऊली तुझे अनंत उपकार  आम्हा पामरांवर  तूच शिकविले आम्हा प्रेम  करण्यास अक्षरांवर         ...

माननीय दिशा पिंकी शेख

साहित्य सखी महिला साहित्यिक मंच ,नाशिक आयोजित चौथे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उदघाटक माननीय दिशा पिंकी शेख ह्यांचा परिचय . भारतात विविध कारणावरून समाजात भेदभाव आहेत .ह्यातूनच विविध वंचित समूहाच्या चळवळी निर्माण झाल्या .या चळवळींचं प्रमुख माध्यम म्हणजे सोशल मिडिया .अशा सोशल मीडियातूनच पुढे आलेल्या पारलिंगी समूहातील स्त्री कार्यकर्त्या म्हणजेच माननीय दिशा पिंकी शेख होय . 'शब्द वेडी दिशा ' या नावाने फेसबुक पेज वर लिहून त्यांनी स्वतःची आपली ओळख निर्माण केली .बिनधास्तपणे व्यक्त होणारी एक संवेदनशील कवयित्री .आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत .त्या वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्यासाठीच्या प्रवक्ते गटाच्या सदस्यही आहेत . मूळच्या नाशिक जवळील येवला येथील असून सध्या श्रीरामपूर येथे वास्तव्यास आहे .डाँ .बाबासाहेब आंबेडकरांना त्या आपले आदर्श मानतात .त्यांचा शब्द प्रकाशनने प्रकाशित केलेला "कुरूप" हा काव्य संग्रह स्वतःच एक राजकीय विधान आहे .त्यांच्या कवितांमध्ये दिशा ताईचं एक ट्रांसवुमन म्हणुन जुन्यापासून नव्या पर्यंतचा प्रवास सापडत जातो . "सहानुभूती नकोय समंजस स्वीकार...

रस्त्यांवर बोलू काही …

​ सौ .रुपाली राहुल जाधव  बागलाण  ह्या रस्त्यांवर बोलु काही ....    रस्ते हे आपल्या जीवनात घडणाऱ्या अनेक चांगल्या वाईट घटनांचे मूक साक्षीदार असतात .कोणाच्या लग्नाची वरात असो ,कोणाची अंतयात्रा असो ,पालखी मिरवणुक असो ,कोणतेही चांगले वाईट आंदोलन असो ते ह्या रस्त्यांवरच होतात .कोणाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर पायघड्या ,सडा -रांगोळ्या असतात तर कोणाचे स्वागत मुक मोर्चाने होते .लॉकडाऊन ,कर्फ्यूच्या काळात गर्दीने ओसंडणारे हेच रस्ते माणसांविना ओस पडलेले आपण पहिले .काहींचे आयुष्यच मुळी रस्त्यांवर सुरु होऊन रस्त्यांवर संपते .आपल्या मराठी भाषेत अनेक म्हणी ,वाकप्रचार ,सुविचार प्रचलित झाले आहे .मराठी ,हिंदी चित्रपटातील अनेक गाणी ह्या रस्त्यांवर आहे ,मनोज कुमार ह्यांचं हे हरियाली और रास्ता ,रुक जाना नाही तू कही हारके ,सडक चित्रपटातील गाणे अशी अनेक गाणी त्यासोबत त्यांची कहाणी हि रस्त्यांवर चित्रित झाली आहे ."ध्येय प्राप्तीसाठी आपण योग्य रस्ता निवडणे तसेच ह्या रस्त्यांवर आपलीसंगत चांगली असणे खूप महत्वाचे असते ."तर अशा ह्या रस्त्यांवर आज आपण बोलु काही .... रस्ता ,पायवाट ,सडक अशा अनेक ना...

संतशिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज रथोत्सव

ठिकाण -सत्यायन नगरी (सटाणा ) कार्यक्रम -संतशिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज रथोत्सव  मार्गशीर्षाच्या सफला एकादशीच्या पहाटेच्या साक्षीने भर थंडीत देवमलेदारांच्या अभिशेकाला सुरुवात झाली .प्रशासन ,  विश्वस्त ,भाविक भक्त,अनेक सामाजिक संस्था ,विविध मंडळे  यात्रौस्तवासाठी सज्ज झाले .     देवा ब्राम्हणांच्या मंत्रघोषात अभिषेक संपन्न झाला .दुपारी 4 वाजता रथयात्रेला सुरुवात झाली . शहरातील चार बॅंडपथक ,दोन ढोल पथक ,अक्कलकुवा येथील आदिवासी नृत्यकलाकार ,टिपरी नृत्य सादर करणारे ,मुबंई येथील भांगडा नृत्य करणारे कलाकार ,दोन शाळांचे लेझीम पथक ,पुरुष आणि महिला भजनी मंडळ तसेच श्री यशवंतराव महाराजांचा जिवंत देखावा आणि मुख्य आक्षण म्हणजे महाराजांचा रथ सुसज्ज अशी रथ यात्रा बघण्याचं भाग्य आम्हा बागलानवासीयांना मिळालं .      खास रथ मिरवणुकीसाठी येवल्याचे भक्त मंडळ  ,नाशिकचे भक्त मंडळ ,सायकलिस्ट तसेच संपूर्ण तालुक्यातुन भाविक दाखल होतात .खास महाराजांवर रचलेली गाणी बॅन्डवर वाजवली जातात .आदिवासी नृत्याला एक वेगळाच गावरान बाज असतो एक नाद असते ती मनाला मोहित करून जात...

देव मामलेदार यशवंतराव महाराजांचा यात्रोत्सव , सोपे नसते हे सर्व..

सोपे नसते हे सर्व.. गेल्या १०१ वर्षांंपासून सटाण्यात देव मामलेदार यशवंतराव महाराजांचा रथोत्सव साजरा होत आहे.. शंभर वर्षांपूर्वी काय परिस्थिती असेल..!  ब्रिटिश-भारतीय स्वतंत्र संग्रामाचे परम शिखर साधले गेले होते.. भारतात रोजचे आंदोलने होत होती.  ब्रिटिश सरकार रोजच नवे नियम काढत होते.. देवादिकांची पूजा करने सुद्धा अवघड होते.. अशा परिस्थितीत १९०० च्या दशकात बागलाण तालुक्यातील काही मंडळी देव मामलेदारांचे मंदिर बांधण्यासाठी झटत होती.. त्यांच्या नावाचा उल्लेख करणे फार गरजेचे आहे..कारण त्यांनी जे कार्य केले.. त्यांच्या योगदाना मुळेच आज आपण रथोत्सव बघू शकतो आहे.. ते महान व्यक्ती म्हणजे..  १)कै. नरहर गोपाळशेठ अलई , नामपुर.  २)कै. गोटू गणूशेठ ब्राह्मणकर , जायखेडा.  ३)कै. शिवराम शेठ शिंपी,  मुल्हेर.  ४)कै. केशव कृष्णाशेठ, वीरगाव.  ५)कै.तानाजी कृष्णाशेठ बागड,सटाणा  ६)कै.अजबा विठ्ठल सोनवणे पाटील,सटाणा  ७) कै. रामचंद्र विठोबाशेठ, लोहनेर.  ८)कै. तानाजी राघोशेठ, मेशी.  ९) कै. श्रीधर गोपाळ खरे वकील,  सटाणे. या मंडळींनी अथक परिश्रम करून मंद...

Subscribe Us